'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'

अजित पवार यांनी भूम परांडा दौऱ्यात दिली ग्वाही

'शेतकऱ्यांना भरीव मदत मिळणारच, निधीची चिंता नाही'

सोलापूर: प्रतिनिधी 

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून भरीव मदत दिली जाईल. त्यासाठी निधीची चिंता करण्याचे कारण नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. 

अजित पवार सकाळी लवकरच धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांकडून पूरस्थितीची, मदत व बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच, जातीने शेतकऱ्यांशी देखील प्रत्यक्ष संवाद साधला. 

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर करून वेगाने काम पूर्ण केले जाईल. आम्ही देखील प्रत्यक्ष पाहणी करून तुमच्याकडून परिस्थिती समजावून घेत आहोत. लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविली जाईल, असे पवार यांनी सांगितले. 

हे पण वाचा  'सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील हा संघाचा माणूस'

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री अतिवृष्टी ग्रस्त आणि पूर परिस्थिती असलेल्या परिसरात पाहणी करत आहेत.

About The Author

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt