'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'

निवडणूक निकालानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

'बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची पुनरावृत्ती'

मुंबई: प्रतिनिधी 

बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र पॅटर्नची पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. मात्र, या निकालावर राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. 

भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांनी एकत्र येऊन ''राष्ट्रीय कार्य' हाती घेतले आहे, त्याचेच हे फलीत आहे,, अशी टीका करून राऊत यांनी या निवडणुकीतही मत चोरी झाल्याचे सूचित केले आहे. 

''बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही  निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले! असे राऊत यांनी समाज माध्यमांवर नमूद केले आहे. 

हे पण वाचा  साधू हत्याकांडातील आरोपीच्याच हाती दिले कमळ

रोज नियमितपणे पत्रकार परिषद घेऊन राज्य आणि केंद्र सरकारला आणि सत्ताधारी भाजपल टीकेचे लक्ष्य जेवायला काय करणारे यांनी सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अल्पविराम घेतला आहे. मात्र बिहार निवडणूक निकालावर त्यांनी आवर्जून समाज माध्यमांद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली 

About The Author

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt