नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी

वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन

नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी

पुणे: प्रतिनिधी 

नवले पुलावर वारंवार अपघात होत असूनही त्यावर उपाययोजना करण्याबाबत प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप करून स्थानिक नागरिकांनी नुकत्याच घडलेल्या अपघाताच्या जागीच प्रशासनाचा प्रतिक्रियात्मक दशक्रिया विधी केला. 

एका भरधाव कंटेनरने नवले पुलावर अनेक वाहनांना धडक देण्याचा प्रकार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी घडला. यावेळी त्या कंटेनर ने पेटही घेतला. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले. 

हा अपघात नेमका कसा घडला याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओकडून तयार केला जात आहे. कंटेनर अतिवेगात असल्यामुळेच चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आरटीओने काढला आहे. 

हे पण वाचा  'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'

नवले पुलावर आत्तापर्यंत अनेक गंभीर अपघात झाले आहेत. त्याबाबत काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र, त्यानंतरही अपघातांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि नियमित प्रवासी यांच्यामध्ये प्रशासना बाबत संतापाची भावना आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच नवले पुलाला भेट देऊन पहाणी केली आहे. 

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt