'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

'आवश्यकता भासल्यास निकष शिथिल करून शेतकऱ्यांना मदत'

सोलापूर: प्रतिनिधी 

अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या संकटात नियमांचा बागुलबुवा न करता वेळप्रसंगी निकष शिथिल करून बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यासाठी काल दोन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मुख्यमंत्र्यांनी माढा येथे भेट देऊन पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांबरोबरच ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे, अन्नधान्य व चीजवस्तूंचे नुकसान झाले आहे, अशांना देखील मदत देण्यात येईल. त्यासंबंधीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ओला दुष्काळ ही एक तांत्रिक संकल्पना आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्याचे काही निकष आहेत. मात्र, सध्याच्या काळात या तांत्रिक बाबींपेक्षा आपतग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे महत्त्वाचे आहे. ओला दुष्काळ जाहीर झाल्यास ज्या प्रकारची मदत करणे शक्य होईल त्या सर्व बाबींची मदत त्यापूर्वीच देण्याचा आपला प्रयत्न आहे, असा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला. 

हे पण वाचा  "उपमुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांच्या पाठबळाशिवाय 'छत्रपती' सुरू झाला नसता" – जाचक

अनेक ठिकाणी धरणातून अचानक अनियंत्रित विसर्ग करावा लागल्यामुळे नुकसान झाले आहे. ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे नियंत्रित स्वरूपात पाणी सोडणे शक्य झाले नाही. त्यातही याबाबत कोणाकडून चूक झाली असेल तर त्याची चौकशी केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. 

सध्याच्या काळात निसर्गाचे चक्र बदलून गेले आहे. हवामान बदलाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आपण सर्वांनीच त्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले. ज्यांच्या शेतातील माती खरडून गेली आहे त्यांना वाढीव मदत देण्यासाठी काही तरतुदी आहेत. त्यानुसार अशा शेतकऱ्यांना निश्चितपणे वाढीव मदत देण्यात येईल. मात्र, सध्या सर्व बाधितांना तातडीची मदत देणे या कामाला प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

About The Author

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt