राज्यभरात पावसाचा कहर

सहा जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा

राज्यभरात पावसाचा कहर

पुणे: प्रतिनिधी 

मान्सूनच्या परतीची वेळ आली असून देखील राज्यभरात पावसाचा कहर सुरूच आहे. चार दिवस उघडीप दिल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पाऊस पुन्हा कोसळायला सुरुवात झाली आहे. 

मुंबई, ठाणे, पालघर, जालना आणि रायगड यांच्यासह पुणे, नाशिक घाटमाथा परिसराला हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट अर्थात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. मुंबईत सध्या पावसाची रिमझिम सुरू असली तरी पुढील ४८ तासात पुणे, मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असून खडकवासला धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे. जालना, अमरावती जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. 

यावर्षी अतिवृष्टीने राज्याच्या बहुतेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. पूरस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. खरिपाचे पीक पूर्णपणे वाहून गेले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरून संसार रस्त्यावर आले आहेत. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. जमीन खरडून शेतातील माती वाहून गेली आहे. एवढे होऊनही पाऊस अद्याप परतीचे नाव घेत नसल्याने नागरिक आणि प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

हे पण वाचा  'दादांच्या कार्यालयात गुन्हेगारांचा वावर'

About The Author

Advertisement

Latest News

स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड स्टील उत्पादक उद्योजकाच्या घर व कारखान्यांवर धाड
कोल्हापूर: प्रतिनिधी  गोव्यात कारखाना व मुख्यालय असलेल्या आणि कोल्हापूरचे निवासी असलेल्या स्टील उत्पादक उद्योजकांचे निवासस्थान, कारखाने आणि कार्यालयावर आयकर विभागाने...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या साहित्यिक पैलू व इतिहासाच्या प्रसारासाठी साहित्य संमेलने
'आपल्या गृहराज्य मंत्रीपदाचा द्या त्वरित राजीनामा'
न्यायव्यवस्थेविषयी चाड असल्यास धर्मांध वकिलावर करा कठोर कारवाई
कोंढवा परिसरात पोलिसांची छापेमारी
लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'

Advt