वडगाव नगरपंचायत : नगराध्यक्षपदासाठी अर्जांची संख्या फक्त दोन; अंतिम दिवशी राजकीय भूकंपाची शक्यता

काही प्रभागांमध्ये गटबाजी वाढल्याने अपक्ष उमेदवारांचेही वर्चस्व

वडगाव नगरपंचायत : नगराध्यक्षपदासाठी अर्जांची संख्या फक्त दोन; अंतिम दिवशी राजकीय भूकंपाची शक्यता

वडगाव मावळ /प्रतिनिधी 

वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ आजचा दिवस उरला आहे. आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी फक्त दोन अर्ज दाखल झाले असून नगरसेवक पदासाठी १८ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. अर्ज दाखल करण्याचा उत्साह काहीसा मंदावल्याचे चित्र दिसत असले तरी अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होण्याची शक्यता निवडणूक कार्यालयाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी – सामना सरळ होणार?

नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपाचे अ‍ॅड. मृणाल गुलाब म्हाळसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अबोली मयूर ढोरे यांच्यात ‘सरळ सामना’ होण्याची चर्चा गावात जोरात सुरू आहे. दोन्ही संभाव्य उमेदवारांनी गेल्या काही दिवसांत कार्यकर्त्यांशी संवाद वाढवल्याने आणि प्रचाराची प्राथमिक रूपरेषा आखल्याने वातावरण रंगतदार झाले आहे.स्थानिक राजकारणात या दोन्ही उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र ओळख असल्याने मुकाबला अधिक चुरशीचा होईल, असे बोलले जात आहे.

हे पण वाचा  '.... मग महापालिका निवडणुका वेगवेगळ्या का लढवता?'

अंतिम दिवशी वाढणार राजकीय धावपळ

उद्या दि. १७ नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगराध्यक्षपदासाठी अजून कोणते नवे चेहरे समोर येतात का, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.काही उमेदवार ‘शेवटच्या दिवशीच अर्ज दाखल करण्याची रणनीती’ अवलंबतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे उद्या दिवसभर निवडणूक कार्यालयात गजबज वाढण्याची शक्यता आहे.

नगरसेवक पदासाठी इच्छुकांची संख्या वाढण्याचा अंदाज

आतापर्यंत १८ अर्ज दाखल झाले असले तरी अनेक इच्छुकांनी अर्जाची कागदपत्रे घेतली असून त्यांनी अंतिम दिवसाची वाट पाहिली आहे. त्यामुळे नगरसेवक पदासाठी अर्जांची संख्या आणखी वाढेल, अशी माहिती निवडणूक प्रशासनातून मिळते.

निवडणूक वातावरण तापले

गावात सध्या चर्चा, भेटीगाठी, रणनीती आखणे याला वेग आला आहे. मतदारही कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो याकडे लक्ष ठेवून आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांसह इतर इच्छुकांचेही पत्ते कधीही उघड होऊ शकतात, अशी उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

 राजकारणात नवा रंग?

अनेक वार्डांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे. तर काही प्रभागांमध्ये गटबाजी वाढल्याने अपक्ष उमेदवारांचेही वर्चस्व वाढू शकते. त्यामुळे अंतिम दिवशी होणारे नामांकन हेच संपूर्ण निवडणुकीचे चित्र बदलून टाकू शकते, असे मत राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Tags:

About The Author

Satish Gade Picture

Correspondent, Vadgaon Maval

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt