निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची नवी योजना

ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य समाजातील युवकांसाठी अर्थसाहाय्य

निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची नवी योजना

मुंबई: प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आलेले असताना सरकारने ब्राह्मण राजपूत आणि आर्य वैश्य समाजाच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांना व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थसहाय्य देणारी योजना अमलात आणली आहे.

राज्य सरकारने ब्राह्मण समाजासाठी परशुराम महामंडळ, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका महामंडळाची स्थापना यापूर्वीच केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून या तिन्ही समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कर्जाची परतफेड नियमितपणे व्याजाचा परतावा दिला जाणार आहे. 

वास्तविक या तीन समाजांसह अन्य काही समाजांसाठी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वीच महामंडळ स्थापन केली होती. मात्र, त्यांचे नियमित कामकाज सुरू झालेले नव्हते. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समोर असताना राज्य सरकारने या महामंडळाच्या मार्फत तरुणांसाठी अर्थसहाय्य योजना अमलात आणल्या आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर असताना तत्कालीन सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अमलात आणली. त्यामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या नव्या योजनांचा फायदा होईल, अशी अपेक्षा महायुतीला आहे. 

हे पण वाचा  'शिंदे यांच्या मनात नाही भाजप बद्दल नाराजी'

About The Author

Advertisement

Latest News

लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार  लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा पुढाकार 
पुणे: प्रतिनिधी  लघु व मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. याला...
भ्रष्टाचार मुक्त वडगांव करण्यासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही – भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण
'भाजप हा कपटकारस्थान, दगाफटका करणारा पक्ष'
संविधान दिनानिमित्त रंगणार 'संविधान लोककला शाहिरी जलसा
नवले पुलावर नागरिकांनी घातला प्रशासनाचा दशक्रिया विधी
विद्यार्थ्यांच्या समयसूचकतेमुळे बिबट्याने ठोकली धूम
भाजपचा उगवता तारा - प्रमोद हरिभाऊ बाणखेले

Advt