'चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी दृष्टी विकसित करणे गरजेचे'

चित्रपट समीक्षक सुहास किर्लोस्कर यांचे प्रतिपादन

'चित्रपटाचा आनंद लुटण्यासाठी दृष्टी विकसित करणे गरजेचे'

पुणे,प्रतिनिधी

कोणत्याही चित्रपटाचा आनंद खऱ्या अर्थाने लुटता यावा यासाठी चित्रपट पाहण्याची विशिष्ट दृष्टी प्रेक्षकांनी विकसित करणे आवश्यक आहेअसे प्रतिपादन चित्रपट समीक्षकविश्लेषकलेखक आणि संगीताचे अभ्यासक सुहास किर्लोस्कर यांनी केले.

महात्मा गांधी सप्ताह 2025 अंतर्गत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने  किर्लोस्कर यांचेचित्रपट कसा पहावाया विषयावरील दृकश्राव्य सादरीकरण आयोजित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षीसचिव अन्वर राजनसाहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख आणि समिती सदस्य प्रा. डॉ. एम एस जाधवस्वप्नील तोंडे आदी मान्यवर व चित्रपट रसिक उपस्थित होते.

आपल्या सादरीकरणा दरम्यान किर्लोस्कर यांनी तद्दन व्यावसायिक चित्रपट वगळता चित्रपटांचे चरित्रपटयुद्धपटऐतिहासिक घटना अथवा व्यक्तींवर आधारित काल्पनिक चित्रपटअल्टरनेट हिस्ट्री अशा चित्रपटांच्या विविध प्रकारांची ओळख करून दिली. त्याचप्रमाणे चित्रपटाचा आस्वाद घेताना पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांचा अर्थ समजावून घेणेचित्रपटाची संहिताअभिनयदिग्दर्शनप्रकाश योजनाध्वनीसंकलन अशा विविध घटकांचा प्रेक्षकांवर पडणारा प्रभाव उदाहरणांसह स्पष्ट केला.

हे पण वाचा  ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन

चित्रपटाच्या पहिल्या दोन मिनिटातच दिग्दर्शक चित्रपटाच्या आशय विषयी काही महत्त्वाचे विधान करून जात असतो. त्यामुळे चित्रपटाचा परिपूर्ण आस्वाद घेण्यासाठी चित्रपट अगदी पहिल्या दृश्यापासून बारकाईने पहावा. चित्रपटातील महत्त्वाची दृश्य कॅमेऱ्याने कोणत्या मितीतून आणि कोणातून चित्रित केले आहेत्यातून दिग्दर्शकाला नेमके काय व्यक्त करायचे आहे हे समजून घ्यावेअसे सांगतानाच किर्लोस्कर यांनी संगीताचा चित्रपटावरील प्रभाव उलगडून दाखवला. त्यासाठी त्यांनी चित्रपटात एकही गाणे नसताना रिचर्ड ॲटनबेरो यांच्या गांधी या चित्रपटाचे उदाहरण दिले. लोकप्रिय चित्रपट आणि दर्जेदार चित्रपट यात नेहमीच फरक असतोहे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले. आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी शिंडलर्स लिस्टगांधीहिडन फीगर्सडंकर्कफ्लॅग ऑफ फादर्सलेटर्स फ्रॉम आयतोजिमाइमिटेशन गेमइन्व्हिक्ट्सलिंकनआयर्न लेडी अशा चित्रपटातील दृश्य सादर करून त्याचे विश्लेषण केले.

अनेक चित्रपटात नायकाची प्रतिमा मोठी करण्यासाठी इतरांना खुजे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोयाकडे त्यांनी लक्ष वेधले. इतिहासातील सत्य स्वीकारण्याची खुली दृष्टी स्वीकारण्याची तयारी रसिकांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. प्रामुख्याने भारतीय प्रेक्षकांमध्ये असलेली आपला नायक सर्वगुणसंपन्न असणे आणि त्याला चित्रपटातून तसेच सादर करणेआवश्यक मानणारी वृत्ती दूर करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

प्रा. डॉ. एस.जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

जुन्या आणि नवीन हिंदी चित्रपट मधील बहारदार गाणी असलेला " सूरमयी शाम " हा स्वरांजली वाद्यवृंद ऑर्केस्ट्रा देखील सप्ताह दरम्यान सादर करण्यात आला.

 

About The Author

Related Posts

Advertisement

Latest News

लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक लोणावळा नगराध्यक्षपद अनुसूचित जातींसाठी राखीव; अशोक मानकर आघाडीवर इच्छुक
वडगाव मावळ (प्रतिनिधी) – लोणावळा नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव ठरले असून, या पार्श्वभूमीवर सुशिक्षित आणि अनुभवी...
'मुंबईला बनवणार जगाचे फायनान्शियल पॉवरहाऊस'
वडगाव मावळ नगरपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध
आता टिपू पठाण टोळीवर पोलिसांचा बडगा
कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणि आमिष
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिच्या पतीची चार तास चौकशी

Advt